25 تغريدة 2 قراءة Aug 17, 2024
धोंडे पेरले तरी धान्य उगवेल अशा गंगेच्या त्रिभुज प्रदेशातील अतिसुपीक जमिनीचे वरदान लाभलेला..
ज्या ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नव्हता त्या साम्राज्यातील सर्वात जास्त GDP असलेल्या Bengal Presidency चा मोठा भाग असणारा
बांगलादेश
हा खरं तर आज..🧵👇
१/n
#म
एक सधन सुखी देश असायला हवा होता..पण
आज हा देश गृहयुद्धात होरपळून निघतोय.
वरकरणी जरी हे गृहयुद्ध आजच सुरुय असं वाटतं असलं तरी
थोडं खोलात जाऊन पाहिलं तर लक्षात येईल की ह्या देशात गृहयुद्ध कधी थांबलंच नव्हतं..!
सुंदरतेचा शापच जणू !
ही आहे त्याच शापित बांगलादेशची गोष्ट👇
ह्या गोष्टीची सुरुवात होते- १९४६ साली !
१९४६ साली इंग्रजांनी हंगामी(interim) सरकार स्थापन करण्यासाठी निवडणुका घेतल्या.त्यात फाळणी विरोधात असणारी काँग्रेस विजयी झाल्याने नेहरू मुख्य म्हणून निवडले गेले.
पण हे मुस्लिम लीगच्या जिना ना आवडले नाही म्हणून त्यानी १६ ऑगस्ट १९४६ हा दिवस
Divided India or Destroyed India हा नारा देऊन Direct Action Day (प्रत्यक्ष कृती दिन)म्हणून जाहीर केला.
अन् ह्या कृतीसाठी मुस्लिम लीगने मुघल काळापासून मुस्लिम बहुसंख्याक असलेला बंगाल निवडला.
पुढे 'Vultures of Calcutta' ह्या शब्दांत जगासमोर आलेल्या ह्या घटनेने जग हेलावून गेले..😐
कलकत्त्याच्या ह्या कत्तलीनंतर हे द्वेषाचे लोण
सद्य बांगलादेशातील नोआखअली येथे हिंदूंच्या कत्तली ,
त्याचे उत्तर म्हणून बिहारमध्ये मुस्लिमांच्या कत्तली असे होत होत पंजाबपर्यंत पोचले.. !
हिंसेला जणू अंतच नव्हता..😐
म्हणून अखेर वेगळ्या मुस्लिम राष्ट्राची मागणी मान्य केली गेली.
आणि मग द्वेष,हिंसा,कपट इ वाम गोष्टींच्या पोटी जणू ह्या मुस्लिम राष्ट्राने जन्म घेतला..!
न् त्याचे परिणाम स्वातंत्र्यानंतर लगेचच दिसू लागले.
जे आधी धर्मांधतेमुळे भारतासोबत भांडत होते..त्या समधर्मियांत भाषा, आचारविचार,संस्कृती इतकचं काय तर त्वचेचा रंग ह्यावरूनही फूट पडू लागली..👇
ज्या मुस्लिम लीगच्या हट्टामुळे स्वतंत्र मुस्लिम देश तयार झाला होता..तीच मुस्लिम लीग..त्यांचे बहुतेक मोठे नेते आजच्या पाकिस्तानातले असल्याने पूर्व पाकिस्तानवर (बांगलादेश) निर्णय लादू लागली.
त्यांच्या मते बंगाली भाषेचा उगम हिंदू असल्याने पाकिस्तानची राज्यभाषा ही फक्त उर्दू असावी.
पण..
पूर्वेकडील बंगाली माणूस मुस्लिम असला तरी तो त्याच्या बंगाली भाषेला..त्याच्या साहित्याला..टागोर सारख्या कवींच्या.. साहित्यिकांच्या वारसाला सोडायला तयार नव्हता.
आणि म्हणून
१९४७ ते १९५६ अशी ९ वर्ष बांगलादेश ; बंगाली भाषा आंदोलनात धुमसत राहिला.
हे आंदोलन दडपण्यासाठी -
पाकिस्तानने हुकुमशाही पद्धतीने लाठीचार्ज ,गोळीबार,हत्या इ सारखे अनेक अत्याचार केले.
म्हणून याच काळाने बांगलादेशला जाणीव करून दिली की
आपण पाकिस्तानपेक्षा लोकसंख्येने जास्त असलो..
जास्त कर गोळा करून देत असलो..
आणि त्यांच्याच सारखे मुस्लिम असलो तरीही
पाकिस्तानी मुस्लिम लीग
आपल्याला..आपल्या गरजांना..आपल्या संस्कृतीला दुय्यमच वागणूक देत राहणार.
आणि म्हणूनच आवामी म्हणजे जनता.. असा बांगलादेशच्या जनतेचा आवाज असणारी ' आवामी मुस्लिम लीग ' स्थापन झाली.
ह्या पक्षाने पुढे स्वतःची धर्मनिरपेक्ष अशी ओळख असावी म्हणून आपल्या नावातून
' मुस्लिम ' हा शब्द
काढला व ती 'आवामी लीग' बनली !
पुढे..१९५८मध्ये अयुब खान ह्या पाकिस्तानी लष्करप्रमुखाने देशाची सूत्रे हातात घेतली तेव्हा तर पूर्वेला सहन करावा लागणारा पक्षपात अजूनच वाढला.
१९६५ सालच्या भारत पाकिस्तान युद्धात तर त्याने ना बांगलादेशच्या संरक्षणासाठी पुरेशी तुकडी तैनात केली..
ना शहीद झालेल्या बंगाली सैनिकांचा योग्य सन्मान केला..उलट बंगाली हे मुळातच लढाऊ नाहीत असे बोलून अवहेलनाच केली.
ह्या आणि अशा अनेक अपमानातून सावरायला बांगलादेशला प्रखर नेतृत्वाची गरज होती आणि ते नेतृत्व त्यांना भेटले - आवामी लीगच्या शेख मुजीब उर रहमान यांच्या रूपाने..!
ह्या तडफदार नेत्याच्या नेतृत्वाने बांगलादेशला पुढील ६ च वर्षात भारताच्या सहाय्याने स्वातंत्र्य मिळाले खरे..पण..त्या ६ वर्षात त्यांना अपरिमित नुकसान व अत्याचार सहन करावा लागला.
त्यातल्या २ सर्वात मोठ्या घटना म्हणजे -
१) १९७० साली आलेले ' भोला ' हे चक्रीवादळ - हे वादळ इतके
मोठे आणि ताकदवान होते की दक्षिण बांगलादेश; ज्याची समुद्रसपाटी पासूनची जास्तीत जास्त उंची १०-१५ फूट आहे.. तिथे पाणी २० फुटांहून जास्त वाढले..!
ह्यामुळे आजही जगाला यापेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडलेले चक्रीवादळ माहीत नाही..👇
आणि इतकी मोठी आपत्ती आलेली असूनही पाकिस्तान सरकारकडून
बांगलादेशला नगण्य साहाय्य मिळाले आणि त्याचाच प्रक्षोभ पुढे निवडणुकीत उमटला.
२) पाकिस्तान(१३१ जागा) +
बांगलादेश(१६९ जागा) अशा एकूण ३०० जागांपैकी बंगाली जनतेने आवामी लीगला फक्त बंगालच्याच १६९पैकी १६७ जागा जिंकून देऊन संपूर्ण बहुमत मिळवून दिले..!
पण..दुय्यम समजल्या जाणाऱ्या बंगाली
मुस्लिमांकडे पाकिस्तानची सूत्रे,
स्वतःला उच्च समजणारा पाकिस्तानी मुस्लिम कसा जाऊ देईल ?
म्हणून मग पाकिस्तानचा झुल्फिकार भुट्टो आणि लष्करशहा याह्या खान यांनी लष्करी बळ वापरून बंगालचे खाच्चिकरण करणे सुरू केले.
आणि ह्याला पाकिस्तानने नाव दिले ऑपरेशन सर्चलाईट आणि मग सुरू झाला -
नरसंहार..! (Bengali Genocide)
ह्यात पाकिस्तानी लष्कराने २ मुख्य गोष्टी केल्या-
१) बंगाली विचारवंत इ जे जे वेगळा देश मागत होते त्यांना संपवणे
आणि
२) दुय्यम असा बंगाली वंश नष्ट करायच्या हेतूने लाखो १२ वर्षांवरील बंगाली स्त्रियांचा (का मुलींचा म्हणाल ?!😡) लैंगिक छळ करणे..😐
बंगाली स्त्रिया साड्या घालतात..टिकली लावतात..म्हणजे बंगालवर मुस्लिम नाही तर हिंदू प्रभाव आहे..!
स्वतंत्र बांगलादेश मागणारे अनेक विचारवंतही हिंदूच होते म्हणून पाकिस्तानने ह्या सर्व गोष्टींकडे ' हिंदू प्रॉब्लेम 'असे बघून उत्तर शोधले.
न् म्हणूनच बंगाली मुस्लिमांवरही क्रूर अत्याचार
केले गेले..!
बंगाली स्त्रिया त्यातही हिंदू व इतर अल्पसंख्याक समाजातील स्त्रिया ह्या युद्धाची लूट आहेत व त्यांच्यावर कितीही अत्याचार केले तरी पाकिस्तानी सैनिक
' पाक ' च राहील असे फतवे पाकिस्तानात काढले गेले..!
यासोबतच जसे हाल हिंदूचे झाले तेच फाळणीवेळी भारतातून गेलेल्या बिहारी
मुस्लिमांचेही झाले ! (होतायत !)
फक्त हे हाल/कत्तली बंगाली लोक ह्या बिहारी मुस्लिमांनी पाकिस्तानची मदत केली ह्या समजामुळे केल्या गेल्या..!
तेव्हाच्या ७कोटी लोकसंख्येतील ३कोटी तरी बांगलादेशी भारतात स्थलांतरित झाले.
अखेर तो डिसेंबर उजाडला..पाकिस्तानने भारतापुढे शरणागती पत्करली..!
पण जाता जाता आवामी लीगचे जे जे मोठे नेते होते त्यांना संपवूनच पाकिस्तान थांबले.जो सुटला किंवा ज्याला मारता आले नाही (मुजीब उर् रहमान)..तोच पुढे बांगलादेशचा राष्ट्रपिता झाला !
हा माणूस पुढारलेल्या विचारांचा होता..कट्टर नव्हता..त्याला खरोखर सर्वांगीण विकास करायचा तर होता म्हणून
त्याने देशातील सर्वात जास्त नुकसान झालेल्या आणि गरजू लोकांना आरक्षण द्यायचे ठरवले. ह्यात स्वतंत्र बांगलादेशासाठी लढलेले स्वातंत्र्यसैनिक, अत्याचार झालेल्या स्त्रिया (बिरांगणा) , देशातील सर्व अल्पसंख्याक लोक इ होते.
आता आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर झालं तसं सगळं व्यवस्थित चालू
होतं..पण १९७५ मध्ये पाकिस्तानने छुप्या युद्धाने(फितवून) मुजीब रहमान आणि त्यांच्या सर्व परिवाराला (२ मुली सोडून) संपवले.😐
आणि पुन्हा एकदा बांगलादेश कधी छुप्या तर कधी उघड अशा गृहयुद्धात.. धर्मांधतेकडे झुकला जातो..झुकला जातोय..😐
म्हणजे बघा हां -
मुजिबच्या हत्येनंतर बांग्लादेशात
किमान २ प्रधानमंत्र्यांचे खून झालेत..किमान २ वेळा लष्करी राजवट लागलीय..आणि एकूण २१ प्रधानमंत्री होऊन गेलेत.
स्वतंत्र झाला तेव्हा मुजीबमुळे धर्मनिरपेक्ष असणारा बांगलादेश..१९७७ मध्ये संविधानातून धर्मनिरपेक्ष हा शब्द काढून टाकतो..१९८८ मध्ये इस्लामिक देश म्हणून राजमान्यता देतो..!
न् आज चालू असलेले गृहयुद्ध जरी आरक्षणाबद्दल असले तरी त्याला
त्यातल्या त्यात धर्मनिरपेक्ष आवामी लीग (अर्थात शेख हसीना - मुजीबची मुलगी) आणि पाकिस्तानचा पाठींबा असलेली जमात ए इस्लाम + BNP पक्ष अशी धर्मांधेतेची किनार आहेच..!
म्हणून म्हणतो - इथलं गृहयुद्ध कधी थांबलेलंच नाही..😐

جاري تحميل الاقتراحات...