आशीष माळी
आशीष माळी

@Garjana206

11 تغريدة 2 قراءة Apr 04, 2024
लिंब शेरी गावातील असलेली कलात्मक विहीर /बाराव बारा मोटे ची विहीर म्हणतात.ह्या मागे मोठा इतिहास आहे.
ही शाहू महाराजानी वीरुबई ह्यांचा साठी बांधलेली.
पण ह्या विरू बाई कोण?
शंभू महाराजांच्या बलिदाना नंतर झुल्फिकार खाना ने रायगड ताब्यात घेतला
त्या आधी महाराणी येसूबाई नी मुत्सद्दीपणाने राजाराम महाराज ल रायगड वरुन हलवले.येसूबाई आणि शाहू महाराज मुघलांच्या कैदेत सापडले. नगर सोलापूर ,औरंगाबाद जिथे औरंगझेब जाईल तिथे झिनातूंनिसा नजरेखाली येसूबाई आणि शाहू महाराज असायचे.त्या बरोबर ज्योताजी केसरकर ,उद्धव योगदेव, मोरोपंत
सबनीस पण असायचे.शाहू महाराज ह्यांचे १२ वर्षाचे झाले तेंव्हा झिनातुंनिसा आणि येसूबाई ,शाहू महाराजांच्या लग्न विषयी चर्चा करू लागला.मुघल तळा वर शाहू महाराजांची २ लग्ने औरंगझेब ने लावली.सरदार
1.रुस्तम राव ह्यांची कन्या राजस बाई
2. कान्हेरखेड शिंद्यांनी अंबिकाबई.
औरंगझेब ने शाहू महाराजांच्या बायको ल मुंह दिखाई साठी बोलावले.पण मराठ्यांच्या मध्ये स्त्रिया पर पुरुषाला चेहरा दाखवत नाही म्हणून झिनातुंनिसा ने आंबिकाबई बरोबर आलेल्या पाठरखिनीला राणी बनवून पाठवले.औरंगझेब ल संशय आला नाही. औरंगझेब ने दोघांना आशीर्वाद दिला.
इंदापूर सुपे आणि अक्कलकोट नव्या सुनेच्या नावावर केले.
त्यानंतर पाठ रखिन कायमची शाहू महाराज कडे राहिल.त्या कधी लग्नाची बायको झाली नाही.पण जिवंत असे पर्यन्त त्यांचा आधार मोठा होता.त्यांची हुशारी ,समजतुदरपणा ,शहाणपण आणि ज्येष्ठता मुळे त्यांना भोसले घरात मनाचा मान होता.
अगदी पेशवे आणि इतर सरदार सुद्धा त्यांचा उल्लेख मातोश्री म्हणून केला आहे.
नानासाहेब पेशवे जेंव्हा सातारा मध्ये दररोज पुण्याला पत्रे लिहायची त्यात ही उल्लेख आढळतो .
२४ डिसेंबर १७४० ल त्यांचा मृत्यू झाला.तेंव्हा जिथे संगम माहुली इथे फक्त भोसले च राजघराणे चे लोकांचे दहन केले जाते
तिथे त्यांचे दहन केले.
विरू बाई ह्यांच्या मृत्यु नंतर शाहू महाराजांच्या इतर राण्या (सकवर बाई आणि सगुणा बाई) मध्ये वाद चालु झाला.पुढे त्यांचे अनेक गंभीर वाईट परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागले.
शाहू महाराज ह्यांनी झिनातुंनिसा ह्यांच्या स्मरणार्थ सातारा मध्ये मशीद उभी केले ती आजही
बेगम मशीद म्हणून पेठेत ओळखली जाते.विरुबई ह्यांना एक कन्या राजस बाई.आणि एक दत्तक पुत्र म्हणजे फत्तेसिंह भोसले.शाहू महाराज जेंव्हा स्वराज्यात आले. तेंव्हा ताराबाई गत मधील अनेक सरदार नी विरोध केला त्यात नगर जवळ शिवणे गावात सरदार सयाजी लोखंडे ह्यांनी शाहू महाराज वर हल्ला केला.त्यात
शाहू महाराज नी सर्व जणांना कापून काढले.पण लोखंडे ची बायको त्याच्या लहान मुलाला घेऊन अभय मागितले."ह्यास वाचवावे, अन्यायी होते ते मारले गेले" अशी प्रार्थना केली.
त्या मुलाला शाहू महाराजानी आणि विरू बाई नी मुला प्रमाणे वाढवले.
वाढवले. फत्तेसिंह सुद्धा विरू बाई च शब्दाबाहेर गेला नाही.
मातृ वंशने औरंगझेब ने दिलेले साडी चोळी साठी दिलेले अक्कलकोट जहागीरदार विरुबाई नी फत्तेसिंह भोसले ह्यांना दिले.आजही त्यांच्या देव्हाऱ्यात विरू बाई ची सोन्याची मूर्ती आहे
फत्तेसिंह नी विरूबई च मृत्यु नंतर बनवलेली.
औरंगझेब ची मुलगी झीनत-ऊन-निस्सा बेगम हिने छत्रपती स शाहू महाराजांचा मुघल कैदेत संभाळ केला होता शिवाय धर्मांतरण होऊ दिले नव्हते.१७२१ मध्ये तिच्या मृत्यू नंतर तिच्या नावाने साताऱ्यात गुरुवार पेठेत मशीद बांधली.
बेगम मशीद सातारा

جاري تحميل الاقتراحات...