सनातनी राजेश 🚩सनातन धर्म हाच राष्ट्रधर्म 🚩
सनातनी राजेश 🚩सनातन धर्म हाच राष्ट्रधर्म 🚩

@rajrajsi

25 تغريدة 99 قراءة Mar 04, 2023
कसब्याच्या अवसानघातकी पराभवाची
परखड समीक्षा करणारा सुजित भोगले यांचा लेख
(लेखकाची तळमळ समजून घ्या )
"हे बोलणार नव्हतो पण कोणीतरी बोललेच पाहिजे"
महाआघाडीची अडीच वर्षांची राजवट मोगलाईची आठवण करून देणारी होती.त्यांचे अत्याचार हे हुकुमशाहीचा कळस होते.
त्यांच्या या मोगलाई वर्तनाला
महाराष्ट्र भाजपा विरोधी पक्ष म्हणून प्रतिकार करण्यात सपशेल अपयशी ठरत होती. इतकेच नाही तर त्यांच्याशी वेळोवेळी तडजोडी करून त्यांना प्रत्येक संकटातून सहीसलामत बाहेर पडायला मदत सुद्धा करत होती. जणू हे सरकार टिकावे ही महाराष्ट्र भाजपाचीच इच्छा होती.
कोरोना काळातील सरकार आणि सत्ताधाऱ्यांचे वर्तन आठवा , कोसळलेली प्रशासकीय यंत्रणा आठवा, भ्रष्टाचार आठवा, कामगारांची केलेली ससेहोलपट आठवा, सर्वाधिक बळी जात असतानाही स्वतःला सर्वोत्कृष्ट घोषित करण्याचा उद्दामपणा आठवा, संजय राऊत यांचे वर्तन आठवा,
धारावीत संघाने केलेली सेवा ज्याचे बरखा दत्त सारख्या पत्रकाराने सुद्धा कौतुक केले आणि त्यावर सुद्धा महा आघाडीची प्रतिक्रिया उपकार केले का अशीच होती हे आठवा, मोदींना मारलेले टोमणे आठवा, आणि या सगळ्या घटनाक्रमातील भाजपाची निष्क्रियता आठवा.
अनंत करमुसे मारहाण, आव्हाडांचे खोटे कोरोना झाल्याचे घोषित करणे, फडणवीस यांचे त्यांना लगेच गेट वेल सून म्हणणे, नेव्हल ऑफिसर ला मारणे, पालघर साधू हत्याकांड, सुशांत सिंग हत्या, दिशा सालियन हत्या, अर्नब प्रकरण , कंगना प्रकरण, आणि या सगळ्यावर पाणी ओतणारी फडणवीस आणि राऊत यांची बंद
दरवाज्याआड चर्चा ज्यानंतर सगळे शांत झाले हे पण आठवा.
नंतर अंबानींच्या घराखालील स्फोटके, वाजे , अनिल देशमुख , १०० कोटी खंडणी, मनसुख ची हत्या... सगळे सगळे आठवा आणि यावर सुद्धा भाजपची निष्क्रियता आठवा.
केंद्रातून सरकार हालचाल करत होते या लोकांना शक्य तिथे अडकवत होते,
राज्यपाल शक्य तिथे थोपवून धरत होते पण विरोधी पक्ष असणारा भाजपा कुठे होता ?
नारायण राणे यांना भरल्या ताटावरून उठवून अटक केली , केतकी चितळे ला फुकट जेल मध्ये सडवले एक ना दोन किती किस्से सांगायचे... ? आणि प्रत्येक वेळी तो राऊत समोर येऊन अक्षरशः भाजपाला उभ्याने ....
आणि यांची शांती भंग व्हायचीच नाही...
या सगळ्या गोष्टी सामान्य नागरिक , हिंदू , भाजपचे कट्टर मतदार हतबल होऊन बघत होते... आणि अक्षरशः दिवस मोजत होते की कधी ना कधी हे सरकार पडेल , भाजपची सत्ता येईल आणि मग याचे सव्याज उट्टे काढता येईल...
अमित शहांच्या कृपेने आणि एकनाथ शिंदेंच्या हिमतीने सरकार पडले, सत्तांतर झाले.
आता सगळ्यांना एकच आशा आणि अपेक्षा होती की सगळ्या प्रलंबित खटल्यांना वेग येईल आणि गेली अडीच वर्षे हिंदुत्ववाद्यांनी जे सहन केले आहे, सोसले आहे त्याची परतफेड होईल
तसे झाले का ??
त्या नंतर काय घडले आहे ?
अंधेरीची जागा गरज नसताना देऊन टाकली... लढून हरा की .. पण जागा दान केली .... राजकीय संस्कृतीच्या गप्पा मारल्या... त्याच संस्कृतीचा गळा महाआघाडीने या दोन पोट निवडणुकांना घोटला पण यावर भाजपाने तोंड उघडले का ?
नाही
रोहित पवारांचे क्रिकेट बोर्डावर आगमन झाले
भाजपा वाले टाळ्या पिटत हातात bat घेऊन त्याच्या बरोबर फोटो काढू लागले...
उद्धव ठाकरे यांच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशीच होत नाही म्हणून गौरी भिडे कोर्टात गेल्या तिथे त्या केस ला जितके लांबवता येईल तितके लांबवण्याचा प्रयास चालू आहे... आणि तो राज्य सरकार कडून चालू आहे...
संजय राऊत दिल्लीश्वरांच्या कोपाने आत गेला, आता बाहेर आला की तो परत मोकाट सुटला आहे वाट्टेल ते बोलतो आहे आणि महाराष्ट्र भाजपा त्याला भिऊन गप्प बसली आहे.
सरकार बदलले आहे हे कुठे दिसते आहे ? प्रशासकीय कामे नीट होत आहेत , राज्याचा विकास होतो आहे,
मेट्रो आणि सर्वच अडकलेले प्रकल्प सुरु झालेले दिसत आहेत..
पण
पण
पण
गेली अडीच वर्षे महा आघाडी ने जो नागडा नाच घातला होता त्याबद्दल त्यांना शिक्षा व्हावी असे गृहखात्याकडून काय होते आहे ?
काहीही नाही.
पवारांनी , राऊतने , उद्धव यांनी जी काही वक्तव्ये केली ,
वर्तन केले या विरुद्ध किंवा याला वचक बसेल असे गृहखात्याने काय केले आहे ?
काहीही नाही.
आत्ता सीट् गेल्यावरआंधळे गुलाम जागे झाले आहेत आणि ब्राह्मण लोकांना शिव्या देत आहेत त्यांनी फक्त खालील प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
पवार काका मुस्लिमांचे लांगुलचालन करतात म्हणून त्यांचा उमेदवार पडणे आवश्यक होते , मान्य आहे.
पवार काकांना असे लांगुलचालन करता येऊ नये म्हणून महाराष्ट्र भाजपाने काय केले आहे ? त्या भाषणाच्या विरुद्ध साधी तक्रार तरी दाखल केली आहे का ?
तुम्ही पवारांच्या नातवाच्या मांडीला मांडी लावून बसा , फोटो काढून घ्या, करमुसे यांना मारहाण करणाऱ्या आव्हाडांना एका दिवसात जामीन द्या आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून दुसऱ्या दिवशी व्यासपीठावर मिरवा ..
पण पवारांशी आणि त्यांच्या पक्षाशी जमिनीवर कोणी लढायचे तर आमच्या मतदारांनी
का ?
तर आम्हीच एकमेव हिंदुत्वाचे तारणहार आहोत म्हणून ...
हे मोदी म्हणाले तर लाख वेळा मान्य करू.. महाराष्ट्र भाजपाचे वर्तन पाहून मान्य करता येईल का ? त्रिवार नाही...
कसबा सीट पडली , ब्राह्मण नालायक आहेत, हिंदूंना दुहीचा शाप आहे..
अरे पण सुरुवात कोणी केली ?
पवारांशी चुम्बाचुंबी केली आणि महा आघाडीच्या पप्प्या भाजपा नेत्यांनी घेतल्या म्हणून लोकांनी तुम्हाला लाथाडले आहे हे मान्य करण्याचे धाडस का नाही तुमच्यात ???
राजकीय संस्कृती जपणे ही महाभाजपची नैतिक जबाबदारी आहे. याचे पालन करताना हिंदुत्ववादी तुडवले गेले तरी पर्वा नाही.
आम्ही सुडाचे राजकारण करणार नाही , पक्षाच्या पलीकडे मैत्री जपू..
हे सगळे तुम्ही करणार...
आणि हे बघून संतापलेले तुमचे मतदार फक्त तुम्हाला मत देणार नाहीत.. मत द्यायला घराबाहेर पडणार नाहीत. म्हणजे ते इतके एकनिष्ठ आहेत की त्यांना भाजपा सोडून अन्य कुणाला मत सुद्धा द्यायचे नाही
कारण ते नरेंद्र मोदी या माणसाच्या ऋणात आहेत..
पण त्यांनी मतदान केले नाही म्हणून ते गुन्हेगार... हिंदू द्रोही वगेरे वगेरे..
इतका दुतोंडी पणा जमतोच कसा.. ???
कसब्यातील मत न देणारा मतदार जर गुन्हेगार असेल, हिंदू द्रोही असेल तर गेली २.५ तीन वर्षे राजकीय संस्कृती जपणे या नावाखाली
या सगळ्या अपप्रवृत्तींना संरक्षण देणारी महाराष्ट्र भाजपा कोण आहे ? आणि भाजपचे नेते कोण आहेत ???
त्या किरीट सोमय्याला अक्षरशः मारहाण केली .. पण त्याचे सुद्धा काहीही झाले नाही.
गेल्या ३ वर्षातील एक प्रकरण असे दाखवावे जे महाराष्ट्र भाजपाने तडीला नेले आहे
आणि संबंधित व्यक्तीला शिक्षा झाली आहे.
एक प्रकरण दाखवा...
अजूनही सांगतो आणि परत एकदा सांगतो... वारंवार हेच सांगतो...
महाराष्ट्र भाजपा जोवर मोदी आणि शहांच्या मार्गाने जाणार नाही. कट्टर हिंदू होणार नाही अशीच तोंडघशी पडणार आहे. वारंवार पडणार आहे.
कारणे
तुमच्या निष्ठावंत आयुष्य वेचणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पेक्षा तुम्हाला अन्य पक्षातील आयात मंडळी जवळची वाटत आहेत. त्यांच्या बळावर सत्ता सोपान गाठता येईल हा भ्रम तुम्हाला झाला आहे.
सेटलमेंट चे राजकारण सामान्य मतदाराला समजत नाही हा तुमचा गैरसमज आहे.
मोदींच्या पुण्याईच्या बळावर आम्ही कसेही वागलो तर लोक आम्हाला मतदान करतील हा तुम्हाला भ्रम आहे.
कट्टर हिंदुत्व हाच मंत्र संपूर्ण देशात भाजपाचा पाया स्थिर करतो आहे, रुंदावतो आहे आणि महाराष्ट्र भाजपा ही एकमेव अशी शाखा आहे ज्यांना सर्वधर्मसमभावचा किडा चावला आहे ,
राजकीय संस्कृती पालन करण्याचा विंचू चावला आहे. आणि राजकारण म्हणजे सेटलमेंट करणे असे वाटत आहे...
परत एकदा सांगतो भाजप ने कट्टर हिंदू व्हावे. पण तुम्हाला कट्टर होण्याची लाज वाटते, सद्गुणविकृती सोडायची नाही
मग भोगा.... हे वारंवार होत रहाणारच आहे..
✍️सुजित भोगले✍️

جاري تحميل الاقتراحات...