Malhar Pandey (MODI KA PARIVAR)
Malhar Pandey (MODI KA PARIVAR)

@malhar_pandey

10 تغريدة Jun 25, 2022
#Thread :
२५ जून १९७५ रोजी, इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करून संविधानाची हत्या केली हे सगळ्यांना माहित आहेच ! पण नेमकं काय काय केलं हे जाणून घेऊया :
भारताची आंतरिक सुरक्षा धोक्यात आली आहे असे कारण देऊन आणीबाणी लागू केली ! 1/10
(खरं कारण - जे.पी. आंदोलनाचे वाढते स्वरूप आणि इंदिरा गांधींच्या विरोधात सामान्य जनतेचा वाढत चाललेला रोष या कारणामुळे काँग्रेस ने आणीबाणी जाहीर केली होती)
२५ जून १९७५ ला आणीबाणीची घोषणा केली व देशभरातील जवळपास सगळ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले. 2/10
परंतु, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांना अटक करण्यात आले नाही.
प्रेसवर संपूर्ण सेन्सॉरशिप जाहीर करण्यात आली.
कोणत्याही वृत्तपत्राला अटक केलेल्या व्यक्तींची संख्या, नावे, किंवा ठावठिकाणा सांगण्यापासून मनाई केली होती. 3/10
सरकारच्या विरोधात टीका केल्यास वृत्तपत्राचा लायसेन्स रद्द करण्यात येईल अश्या प्रकारचे धमकी स्वरूपातील आदेश देण्यात आले होते.
आणीबाणीच्या बद्दल कोणत्याही प्रसारमाध्यमंध्ये काहीही बोलले जाऊ नये म्हणून वीजपुरवठा सुद्धा खंडित करण्यात आला होता. 4/10
MISA किंवा आंतरिक सुरक्षा अधिनियम या क्रूर कायद्याच्या अंतर्गत विरोधी पक्ष नेत्यांना अटक केली होती.
८ डिसेंबर १९७५ इंदिरा गांधी यांनी प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया रद्द केले.
कलम १४, २१, २२, १९ अश्या विविध अधिकारांना इंदिरा गांधींच्या आदेशावरून रद्द करण्यात आले. 5/10
१९७६ मध्ये ७००० पेक्षा जास्त पत्रकारांना अटक करण्यात आली होती.
अनेक गायक, गीतकार आणि कलाकार यांच्यावर व्यक्त होण्यापासून बंदी आणली गेली. 6/10
अनेक खासदार जेल मध्ये असताना इंदिरा गांधी यांनी त्यांच्या मनाला आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला परवडणाऱ्या तरदुदी संविधानात घालून वेळोवेळी राष्ट्रपती ला वेठीस धरून घटना दुरुस्ती करवून घेतली.
अनेक राज्यांची विधानसभा बरखास्त करण्यात आल्या. 7/10
बळजबरी नसबंदी साठी संजय गांधी यांनी मानवी हक्कांना पायाखाली चिरडले.
असंख्य निष्पाप लोकांची हत्या करण्यात आली, ज्याचा आकडा आजही अनेकांना माहित नाही.
याहून जास्त भयानक गोष्टी आणीबाणीच्या काळात घडल्या. 8/10
आज काँग्रेस, संवैधानिक मूल्यांची जपणूक, संवैधानिक अधिकार, मानवी हक्क या गोष्टींवर भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधते परंतु आपल्याच पक्षाचा विकृत इतिहास काय आहे हे सांगितले कि पुन्हा तेच रडगाणे सुरु करते. आज आणीबाणी लागू होऊन ४७ वर्षे पूर्ण झाली. 9/10
व्यक्ती स्वातंत्र्याच्या, प्रेस स्वातंत्र्याच्या गप्पा ठोकणाऱ्या पत्रकारांनी मागे वळून पाहावं कि ४७ वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं....
इंदिरा गांधींच्या क्रूर निर्णयामुळे ज्या हजारो लोकांचे प्राण गेले अश्या सगळ्यांना विनम्र अभिवादन ! 10/10
#Emergency1975HauntsIndia

جاري تحميل الاقتراحات...