समीर कुलकर्णी
समीर कुलकर्णी

@paramvaibhav

11 تغريدة 3 قراءة Apr 22, 2022
#Thread
४ फोटो आणि ४ घटना.
पहिल्यांदा २ फोटोंबद्दल बोलुयात.
श्रीपाल सबनीस म्हणतात इस्लामचा शांततावादी विचार जगाला आवश्यक आहे.
मौलाना तौकिर रझा म्हणतो की ज्या दिवशी देशातील मुस्लिम रस्त्यावर येतील तेव्हा त्यांना सांभाळणे फार कठीण जाईल.
किती परस्पर विरोधी आहे ना हे ? +
श्रीपाल सबनीस ह्या महाशयांनी स्वतःच्या अकलेचे तारे तोडलेत आणि हे बोलताना एकही पुरावा दिला नाही तर फक्त वायफळ बडबड केली.
त्या उलट , मौलनाने लगेच पोटातील गोष्ट ओठावर आली की काय होते त्याचा प्रत्यय दिला.
आता जातीयवाद ..पुढचे दोन फोटो.
अमोल मिटकरी ने ब्राह्मण समाजाची टिंगल केली..त्याच वेळी सुप्रिया सुळे एका गुरुजीं कडून श्रीगणेशाची पूजा करवून घेताना.
पुन्हा परस्पर विरोध, अर्थात हा damage control करायचा प्रयत्न होता की काय असा स्वाभाविक प्रश्न मला पडला.
असो, आयुष्यात फक्त +
जातीपातीचे राजकारण करणे ह्या पलीकडे दुसरा कुठला उद्योग नसल्या कारणाने हे सगळे उद्योग चालतात..."मी त्या बामनाची कधी जिरवली" ह्यात असुरी आनंद घेणारा हा हिंदू समाजात असूनही स्वतःला अहिंदू समजणारा हा गोंधळलेला किंवा जाणून बुजून वागणारा हा वेगळा समाज आहे....
त्यात फक्त राजकारणीच +
नाही..तर ,शिक्षण, साहित्य , कला, खेळ व अन्य सर्व क्षेत्रात हा समाज फोफावलेला दिसून येतो. उद्दिष्ट एकच, जातीपातीत अडकवून हिंदू समाज फोडायचा आणि एकदा हिंदू फुटले की मुस्लिमांचे , ख्रिश्चनांचे लांगूलचालन करून सत्तेची मलई वर्षानुवर्षे खात राहायची.
तमाम हिंदूंनी हे ओळखायला हवे. +
जात महत्त्वाची असेल तर धर्म ही तितकाच किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचा आहे.
ज्या हिंदू धर्मासाठी छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे ह्यांनी अहोरात्र एक केली तो धर्म फक्त जातींच्या जाळ्यात अडकून पडणार का ?
धर्मवीर संभाजी महाराजांनी आपले प्राण दिले पण हिंदू धर्म सोडला नाही +
हे आपण विसरणार का ?
गुरू गोविंद सिंहांची चारही मुलांनी मरण पत्करले पण हिंदू धर्म सोडला नाही , हे आपण विसरणार का ?
हा उभा महाराष्ट्र सनातन धर्म , भगवत धर्म पताका नाचवित होता हे आपण विसरणार का ? ही महाराष्ट्र भूमी थोर संतांची आहे, थोर विद्वानांची आणि शूर मावळ्यांची आहे हे आपण +
विसरणार का ?
आज प्रत्येक हिंदू कुटुंबाने , आपण कर्मठ हिंदू आहोत हा विचार जपला पाहिजे आणि तोच विचार पुढच्या पिढीला दिला पाहिजे आणि हिंदू धर्मच इतर धर्मांपेक्षा जास्त सहिष्णू आहे हे सुध्दा सांगितले पाहिजे , असं मला वाटतं.
पण, हिंदू धर्म म्हणजे जुन्या विचारांचा ,
अंधश्रद्धा +
पाळणारा, पुजे अर्चेत अडकून पडणारा असा खोटा प्रचार काही जातीयवादी लोकं करतायेत..त्यांच्या खोट्या प्रचाराला आपण बळी पडता कामा नये.
सगळे नवीन विचार सर्वात जास्त हिंदू धर्मानेच स्वीकारले आहेत...त्याचे कारण की हिंदू धर्म हा #वसुधैव_कुटुंबकम ह्या ज्ञानशील तत्वज्ञानावरुन जाण्याचा एक +
प्रशस्त मार्ग आहे..आणि साऱ्या विश्वात, हीच एक उत्तम जीवन पद्धती आहे असा एक भाव आपण आपल्या मनी बाळगतो.
त्यामुळे, श्रीपाल सबनीस असो किंवा अमोल मिटकरी ह्यांना आपण बदलून काही फायदा नाही..आपण आपला धर्म, आपली जीवन पद्धती इतक्या उंचीवर नेऊन ठेऊ की त्यापुढे ही लोकं अतिशय ठेंगणी दिसली +
पाहिजेत.
#तात्पर्य हे की आपण त्या शेतकऱ्याने कष्टाने जमा केलेल्या लाकडांची मोळी आहोत, ज्या मोळीला हिंदु धर्माच्या दोऱ्याने घट्ट बांधले आहे.
दोरा सुटला की मोळी सुटली...मग सगळंच सुटतं, प्रेमाच्या गाठी पण आणि नात्यांचे बंध पण.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

جاري تحميل الاقتراحات...